खचित उगीच भय दापी मजला ।
असतां गुरुवरि भार सगळा ।
अशुभ घोर तो माझा सरला ॥
तापवि भानु किती जरि भूला ।
विमल मेघ परि वर्षुनि सु-जलां ।
करि तो झडकरि शांततेला ॥
गीत – ना. वि. कुलकर्णी
संगीत – मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- बालगंधर्व
नाटक – संत कान्होपात्रा
राग – काफी
ताल-त्रिवट
चाल-चरन धरन मन
गीत प्रकार – नाट्यसंगीत