खचित उगीच भय दापी मजला ।

खचित उगीच भय दापी मजला ।
असतां गुरुवरि भार सगळा ।
अशुभ घोर तो माझा सरला ॥

तापवि भानु किती जरि भूला ।
विमल मेघ परि वर्षुनि सु-जलां ।
करि तो झडकरि शांततेला ॥

गीत – ना. वि. कुलकर्णी

संगीत – मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन

स्वर- बालगंधर्व

नाटक – संत कान्होपात्रा

राग – काफी

ताल-त्रिवट

चाल-चरन धरन मन

गीत प्रकार – नाट्यसंगीत