भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पापपुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी
कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे-त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी
फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आसवे ढाळी
दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचित पाळी
गीत – रजनीकांत राजाध्यक्ष
संगीत – प्रभाकर पंडित
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार – भावगीत