Showing posts with label अशोकजी परांजपे. Show all posts
Showing posts with label अशोकजी परांजपे. Show all posts

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनांत बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलुनिया आली गडे बावरी तनू

दर्‍यांतुनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारितो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनू

गीत – अशोकजी परांजपे

संगीत – अशोक पत्की

स्वर- सुमन कल्याणपूर

गीत प्रकार – ऋतू बरवा, कल्‍पनेचा कुंचला, भावगीत

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे धुंद त्या सुरांनी

असा चंद्र कलता रात्री रानगंध यावा
सर्व भान विसरुन नाती स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गुज अंतरिचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावा
भाव दग्ध मिटला हा रे पुन्हा फुलुनि यावा
असा शांत असता वारा रानपक्षि गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनि जावा
स्वप्‍न हेच हृदयी धरिले खुळ्या आठवांनी

गीत – अशोकजी परांजपे

संगीत – अशोक पत्की

स्वर- सुमन कल्याणपूर

गीत प्रकार – शब्दशारदेचे चांदणे, भावगीत