ईश चिंता निवारील सारी ।
भाव निश्चल मनें ठेविं तूं त्यावरी ॥
संकटें शत जरी प्राप्त झालीं ।
सर्व संहारुनी योग्य कालीं ।
करिल कल्याण तो चंद्रमौली ।
पूर्ण विश्वास या विप्रवचनीं धरीं ॥
गीत – गो. ब. देवल
संगीत – गो. ब. देवल
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक – संगीत शारदा
ताल-दीपचंदी
चाल-देव विघ्नेश तारी
गीत प्रकार – नाट्यसंगीत