कधी आम्ही गार सावली चाखितो, कधी उन्हाच्या चटकी
जगणे अमुचे नका विचारू आम्ही पाखरे भटकी
बालपणी बल करांत नव्हते
निराधार ते जीवन होते
जोवर होती आई चोचिण्या कण्या-बाजरी-मटकी
पंख पसरिता उडण्यापुरते
मग घरट्यातील जीवन सरते
चिवचिव करिता कोण ऐकतो साद आमुची लटकी?
पुरे जाहले जातो आता
शोधित फिरतो अपुला दाता
वेळेवर धावेल आमुच्या संकटांचिया घटकी
गीत – अण्णा जोशी
संगीत – अण्णा जोशी
स्वर- राणी वर्मा
गीत प्रकार – भावगीत