कधी गौर बसंती
कधी सावळी छाया
कधी वेल कृशांगी
कधी पुष्कळा काया
दर वळणावरती अनोळखी झालीस
मी ओळखिले तू.. होय, तूच आलीस
ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
गीत – सुधीर मोघे
संगीत – मंगेश गोसावी
स्वर- हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी-रानडे
अल्बम – लय
गीत प्रकार – भावगीत, युगुलगीत